पतजंलीची ५ लाखांची बिस्किटे चोरणाऱ्या दोघांना अटक

अहमदनगर : पतजंली कंपनीचे ५ लाखांची बिस्कीट चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मालमोटारीसह अटक केली आहे.
या दोघांकडून ६ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संतोष आव्हाड व यशवंत कदम (रा. टेंभुर्णी जि.सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबरला वाळुंज (जि.औरंगाबाद) येथून आयशरमध्ये ५ लाख २७ हजार ४२७ रूपये किंमतीचे पतजंली कंपनीचे बिस्कीट घेऊन गाडी चालक गणेश सावंत व संतोष शिर्के हे पुण्याच्या दिशेने निघाले होते.

आयशर पांढरी पूलावर आला असता डिझेल संपल्याने आयशरला पांढरी पूलावर लावून चालक गणेश सावंत हे आयशरमध्येच झोपले व संतोष शिर्के निघून गेले.
रात्री साडेबाराच्या सुमारास दोघा अनोळखी इसमांनी सावंत यांना मारहाण करून आयशरमध्ये डिझेल टाकले व आयशर सावंत यांच्यासह टेंभुर्णीकडे घेऊन गेले.
सावंत यांना टेंभुर्णी येथे सोडून आयशर सोलापूरच्या दिशेने घेऊन गेले. याप्रकरणी अशोक शंकरराव क्षिरसागर यांनी २० डिसेंबरला एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा