पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना फी माफ

जळगाव : जळगावच्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.

या फी माफीचा सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कुलगुरू प्रा.पी.पी. पाटी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा