लोकहिताच्या सर्व योजना तंत्रज्ञानामुळे वेगानं लोकांपर्यंत पोचवणं शक्य झाल्याचं प्रधामंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर २०२० : माहितीतंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.

भारतात तयार होणाऱ्या तांत्रिक सुविधा आता जगभरात उपलब्ध करुन द्यायला हव्यात असं ते म्हणाले. गेल्या महिन्याभरात आर्थिक देवघेवीसाठी २ अब्ज वेळा तर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, स्वामीत्व योजना यासाठी अनेकदा तंत्रज्ञान सुविधेचा वापर देशात झाला असून तंत्रज्ञानामुळे लोकोपयोगी योजना झपाट्यानं पोहचू शकतात असंही प्रधानमंत्री म्हणाले.

आजपासून सुरु झालेली ही परिषद तीन दिवस चालणार असून त्यात ४ हजार प्रतिनिधी सहभागी होत आहेत. २५ देशातले नामवंत तंत्रज्ञ, गुंतवणूकदार, संशोधक या परिषदेला उपस्थिती आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा