प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही पेन्शन योजना (पीएमएसवायएम) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारास दरमहा काही रक्कम गुंतवावी लागते.

या योजनेद्वारे वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा गुंतवणूकदारांना ३ हजार रुपयांच्या पेन्शनची हमी सरकार देते. या योजनेद्वारे गुंतवणूकदारास आयुष्यभर पेन्शन दिली जाते.

योजनेची वैशिष्ट्ये :

● आपल्याला वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत योगदान द्यावे लागेल, सरकार देखील तेवढेच योगदान देईल.

● ६० वर्षे पूर्ण झाल्यावर आयुष्यभर ३ हजार रुपये पेन्शन मिळू शकेल.

● आपल्या मृत्यूनंतर पत्नीला आजीवन दीड हजार रुपये मिळतील.

● पत्नीच्या निधनानंतर कुटुंबासाठी निवृत्तीवेतन किंवा ठराविक रकमेची सुविधा नाही.

योजनेचा लाभ कसा मिळवायचा? :

● या योजनेसाठी बचत बँक खाते अनिवार्य आहे.

● खाते उघडताना आपले वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

● याशिवाय मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे.

● जे कामगार राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी भविष्य निधी संघटना योजना यासारख्या कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत समाविष्ट नाहीत आणि आयकरदारही नाहीत, असे लोक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

● ग्राहकांसाठी मोबाईल फोन, आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.

या योजनेंतर्गत, ग्राहक जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) भेट द्यावी लागेल. त्यानंतर आधार क्रमांक आणि बचत बँक खाते / जन-धन खाते क्रमांक वापरून पीएमएसवायएम नोंदणीकृत होऊ शकतात.

LIC च्या सर्व शाखा कार्यालये, ईपीएफओ / ईएसआयसीच्या कार्यालये, सदस्यांना योजनेसाठी, त्यांच्या फायद्यांविषयी आणि त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी सुविधा पुरविण्यास मदत करतील. ते जवळच्या सीएससी शोधण्यासाठी त्यांना सल्ला देतात.

आपण नोंदणीसाठी जवळच्या सामान्य सेवा केंद्रावर जाऊ शकता. तसेच locator.csccloud.in/ वर शोधक वापरू शकता. स्वत:ची प्रमाणपत्रे आणि आधार क्रमांक या आधारे नाव नोंदणी असेल. तथापि कोणत्याही चुकीच्या घोषणेच्या बाबतीत योग्य दंड आकारला जाऊ शकतो.

एलआयसी हे फंड व्यवस्थापक आणि पेन्शन पेआऊटसाठी सेवा प्रदाता असतील. जमा निधीचे व्यवस्थापन व देखरेख करण्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळावर राहील, जी माननीय केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार आहे.

योजनेत किती गुंतवणूकीची गरज?

● आपले वय १८ वर्षे असल्यास वयाच्या ६० व्या वर्षापासून ३ हजार रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा ५५ रुपये गुंतवणे आवश्यक आहे.

● जर आपण २९ वर्षांचे असाल तर ६० वर्षाच्या वयाच्या ३ हजार रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा १०० रुपये गुंतवावे लागतील.

● जर तुमचे वय ४० वर्षे असेल तर वयाच्या ६० व्या वर्षापासून ३ हजार रुपयांच्या पेन्शनसाठी तुम्हाला दरमहा २०० रुपये गुंतवावे लागतील.

( टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा