पुढील १५ दिवस या जिल्ह्यात “नो एन्ट्री”, ई-पासही केले बंद!

कोल्हापूर, १८ जुलै २०२० : करोनाच्या दिवसेंदिवस वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही.कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी यासंबंधीचा आज हा आदेश काढला आहे.जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारे ई-पास देखील त्यांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहेत.

कोल्हापुरात सोमवारपासून म्हणजेच २० जुलैपासून ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा असून आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हि महत्त्वाची घोषणा केली आहे.

यादरम्यान,सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध व दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा १००% बंद राहणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.पण जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणं गरजेचं आहे, असे सतेज पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा