दिल्ली: बर्याच राज्यात पावसामुळे रब्बी पिकांची पेरणी वाढली आहे. रब्बी पिकांच्या एकूण पेरणीत सुमारे ६.५ टक्के वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रब्बी पिकांची एकूण पेरणी ५७१.८४ लाख हेक्टरवर झाली आहे, तर गेल्यावर्षी आतापर्यंत फक्त ५३६.३५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. चालू रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीत सुमारे १० टक्के वाढ झाली आहे. चालू रब्बी हंगामात मुख्य रब्बी पीक गव्हाची पेरणी २९७.०२ लाख हेक्टरवर झाली आहे, तर मागील वर्षी २७०.७५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.
डाळींची पेरणी वाढून १४०.१३ लाख हेक्टरवर झाली आहे, तर गेल्या वर्षी १३६.८३ लाख हेक्टरवर डाळींची पेरणी झाली होती. रबी डाळींचे मुख्य पीक हरभरा पेरणी गेल्या वर्षी ८९.८९ लाख हेक्टरच्या तुलनेत ९४.९६ लाख हेक्टरवर झाली आहे. उडीद व मूग पेरणी अनुक्रमे ५.७० आणि २.५५ लाख हेक्टरवर झाली आहे, तर गेल्या वर्षीपर्यंत अनुक्रमे ५.८३ आणि ३.०६ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली. चालू रब्बीमध्ये इतर डाळींची लागवड ४.९० लाख हेक्टरवर झाली आहे, तर मागील वर्षी आतापर्यंत ५.२३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.












































