राजगृहावरील हल्ल्यातील दोषींवर कडक कारवाई करा: युक्रांदची मागणी

पुणे, दि ९ जुलै २०२० : ७ जुलै रोजी मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांचा राजगृहावर काही अपरिचीत ईसमांनी हल्ला करून नुकसान केले. त्यांचावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत युवा क्रांती दलने जिल्हाधिकारींना दिले.

समाजकंटकाचा हल्ला करून नासधूस करण्याची ही पाहिले वेळ नाही, यापूर्वी ही अशा अनेक घटना घडवून समाजामध्ये दूषित वातावरण निर्माण करणे, समजामध्ये अस्तिथरता निर्माण करणे, दंगली घडवून आणणे, जनतेच्या मालमत्तेचे नुकसान आणि सार्वजनिक मालमत्तेचे करणे इतक्या मोठ्या कटाचा हा हल्ला असू शकतो, असे युवक क्रांती दलला वाटते. म्हणूनच अशा दोषींना लवकरात लवकर शोधून त्यांचावर कारवाई करण्यात यावी, तसेच समाज घटकांच्या अस्मिता असलेल्या धार्मिक स्थळ व ऐतिहासिक वास्तुंना पुरेसे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी युवक क्रांती दलाने केली. यावेळी यूवा क्रांती दलचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे, व पुणे शहर सेक्रेटरी सुदर्शन चखाले उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा