राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा : मुख्यमंत्री

मुंबई: राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे. तसेच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धती ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सूचना केल्या.
राज्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते अशा सुमारे ३ लाख किमीच्या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पारंपरिक पद्धत वापरली जाते.
रस्त्यांचा दर्जा सुधारावा व ते दीर्घकाळ टिकावेत. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. नव तंत्रज्ञानाच्या आधारे सध्या १ हजार किमी रस्ते बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मृदा सुदृढीकरण तंत्रज्ञान वापरून २५०० किमी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच जर्मन तंत्रज्ञान वापरून ३ हजार किमी रस्त्यांच्या पृष्ठभागाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
तर कोकण व पश्चिम घाटातील २५०० किमी रस्त्यांचे पोरस बिटूमन मिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे.

यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, आमदार अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकामे) अजित सगणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी सादरीकरण केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा