रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; केली ‘ही’ मागणी

नागपूर, २३ डिसेंबर २०२२ उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उमेश कोल्हे हत्या प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्यात आले त्यामुळे या प्रकरणात त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.

विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना बडनेराचे आमदार रवी राणा यांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. रवी राणा म्हणाले या प्रकरणाचा तपास फिरवण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मंत्र्याच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी हे केल्याचा दावा राणा यांनी केला आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

भाजप नेत्या नुपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त ववक्तव्य
केले होते, त्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला. अनेक ठिकाणी आंदोलने देखील झाली. याच काळात अमरावतीचे औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. नुपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र हे प्रकरण उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक दाबल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना देखील फोन केला होता असे राणा यांनी म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा