नैसर्गिक आपत्ती निधीतून मृतांच्या वारसास ८ लाख रुपयांची मदत

भोकरदन, जालना १८ मार्च २०२४ : जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील शिवाजी गणपत कड आणि कुंभारी येथील पल्लवी सोनाजी दाभाडे यांचा काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात वीज पडून दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शासनाकडे पाठपुरावा करून नैसर्गिक आपत्ती निधीतून प्रत्येकी ४ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांकडे आ. संतोष दानवें च्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार संतोष बनकर यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा