साध्वी प्रज्ञा च्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

लोकसभेच्या कार्यकाळात महात्मा गांधींचे मारेकरी, नथुराम गोडसे यांना “देशभक्त” म्हणून वर्णन केल्यावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना एका महत्त्वाच्या संसदीय समितीतून काढून टाकले गेले आहे. साध्वी प्रज्ञा यांना संरक्षणविषयक सल्लागार समितीकडून केवळ अठरा दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती परंतु त्या आता भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भाग घेऊ शकत नाहीत.
साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचा भाजपा पक्ष निषेध करत आहे आणि अशा विधानांना समर्थन देत नाही, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा म्हणाले. भाजपच्या शिस्त समितीने त्यांना पक्षातून काढून टाकण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भोपाळच्या खासदार आहेत. बुधवारी विशेष संरक्षण गटाच्या (दुरुस्ती) विधेयकावरील लोकसभेच्या चर्चेदरम्यान द्रमुकचे सदस्य ए राजा यांनी गोडसे यांनी महात्मा गांधींना का मारले याविषयीचे वक्तव्य उद्धृत केले. साध्वी प्रज्ञा यांनी याला उत्तरं देत म्हणाल्या की नथुराम गोडसे हे देशभक्त आहेत त्यांच्याविषयी असे बोलू नये. या वक्तव्यामुळे काल त्यांचा संसदेत विरोध करण्यात आला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा