शिंदे सरकारची विशेष योजना, शेतकऱ्यांना शेती न करता हेक्टरी १ लाख २५ हजार रुपये कमाई

मुंबई, ६ जुलै २०२३: महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी सरकार वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना सुरू केलीय. जर शेतकऱ्यांनी सरकारला जमीन भाड्याने दिली, तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख २५ हजार रुपये मिळतील. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० ही नवीन योजना राबविण्यात येत आहे.

महावितरणकडून कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या योजनेला राज्यात चांगला प्रतिसादही मिळाला आहे. दरम्यान, ८ मे २०२३ पासून राज्य सरकारने ही योजना अधिक व्यापक करून लोकसहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत या नव्या योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांऐवजी १ लाख २५ हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. यासोबतच दरवर्षी तीन टक्के वाढ होणार आहे.

या योजनेसाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील जमीन वापरली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पादन घेण्याची संधी मिळत आहे. महावितरणच्या वीज वितरण केंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावरील शेतकरी या योजनेत आपली जमीन देऊ शकतात. खरे तर सौरऊर्जेसाठी किमान तीन आणि कमाल ५० एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा