बाराती, २१ सप्टेंबर २०२०: बारामती तालुका व शहरात १४ दिवसाचा जनता कर्फ्युचा कालावधी पूर्ण झाला असुन दि.२१ सप्टेंबर पासून सकाळी ९ ते रात्र ७ वाजेपर्यंत हॉटेल, शाळा व जीम ,पान टपरी सोडून सर्व व्यवसाय खुले राहणार असल्याचे आज व्यापारी व प्रशासनाच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले. वडापाव, चहाच्या टप-या यासारखे छोटे व्यवसाय सुरु करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दुकाने उघडणे व बंद करण्याचा कालावधी सात दिवसांचा असेल रूग्णांची संख्यांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी सांगितले.
प्रांताधिकारी म्हणाले व्यापार्यांनी सोशल डिस्टन्स, सॅनिटाइजर व मास्क लावल्याशिवाय कोणत्याही ग्राहकास दुकानात प्रवेश देऊ नये.१४ दिवसाच्या जनता कर्फ्यूमुळे बाधित रुग्ण कमी झाले आहेत.बारामती तालुका व शहरात प्रशासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविली आहे. त्यास विविध संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जाणार आहे.शहरात घरोघरी जाऊन ९० टक्के चाचण्या करण्यात आल्या आहेत. बारामती शहराच्या सर्व्हेमध्ये नागरीकांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी आढळून आली दि.२१ सप्टेंबर पासून सर्व आस्थापना चालु राहणार आहेत. प्रत्येक व्यवसायीकाकडे थर्मल गन आणि ऑक्सिमीटर असणे गरजेचे आहे.याची प्रशासनाला मदत होईल. मास्क, सॅनिटाइजर व सोशल डिस्टन्सचा वापर केल्यास कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवता येऊ शकतो तसेच वयोवृद्ध लोकांनी बाहेर पडू नये यासाठी कठोर नियम करण्यात येईल. सर्वांनी नियमांचे पालन करून पुढचे लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.एखाद्या दुकान, मेडीकल इ. ठिकाणाहुन सतत रुग्ण सापडत असतील तर त्यावर लक्ष ठेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पं.स.सभापती नीता बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, जवाहरशेठ वाघोलीकर इ. मान्यवर उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव