मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करावेत, समाज कल्याणचे आवाहन

जालना १३ ऑगस्ट २०२४ : जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जावून मन:शांती तसेच अध्यात्मिक वातावरण मिळण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजन अंमलात आणली आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी दि.३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत समाज कल्याण कार्यालय, जालना येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त अनंत कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

योजनेत प्रत्यक्ष प्रवास, भोजन आणि निवासी आदि सर्व बाबीचा प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ३० हजार रुपये शासनाने मंजूर केला आहे.  अर्जदार महाराष्ट्र राज्यातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असावा. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.   लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारापेक्षा जास्त नसावे.

वैद्यकिय अधिकाऱ्याने पुर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारिरीकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याप्रमाणे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या पात्रतेचे निकष आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा