स्वामी समर्थ यांच्या नावे अफवा पसरवून प्रतिमा मलिन करणे थांबवावे : वैभव गोसावी.

इंदापूर, दि. २८ जून २०२० : इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांचे थेट वंशज असल्याचा दावा करणारे वैभव रतन गोसावी यांनी स्वामींच्या नावाने अफवा पसरवून जे काही थोतांड करून आपली झोळी भरण्याचे काम चालू आहे ते थांबविण्याचे आवाहन केले आहे.
गोसावी यांनी पूर्वीच सोलापूर येथील दिवाणी न्यालायत रे.मु.नं.७३१/२०१८ हा दावा दाखल केला आहे. यामध्ये ते स्वामी समर्थ यांचे थेट वंशज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांच्याकडे मोडी भाषेतील पत्र, वंशावळ, जमिनीची कागदपत्र आदी पुरावे सादर केले आहेत.

सध्या स्वामी समर्थ यांच्या नावाने अनेकांनी आपली झोळी भरण्याचे कारस्थान केले आहे. स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेस साडी ,बांगड्या परिधान केलेले दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करीत असल्याचे गोसावी यांनी न्यूज अनकट शी बोलताना सांगितले.

जर वेळीच हे थांबले नाही तर आपण त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा