टी२० क्रिकेट स्पर्धेत पृथ्वीची बॅट पुन्हा तळपली

मुंबई: बीसीसीआयने घातलेली बंदीची शिक्षा पूर्ण केल्यावर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने मैदानात उतरला. त्यात त्याने धडाकेबाज फलंदाजीचा सपाटा लावला आहे.

‘सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२०’ स्पर्धेत पृथ्वीने झारखंड विरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने अर्धशतक झळकावले आहे.
यापूर्वी झालेल्या आसामविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पृथ्वीने अर्धशतक झळकावले होते.
बंदीनंतर त्याने दमदार पुनरागमन करीत क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर काही दिवसांपूर्वी उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. परंतु ही बंदी उठल्यावर पृथ्वी आज मैदानात उतरला आणि त्याने तुफानी खेळी साकारत दमदार पुनरागमन केले.
दरम्यान, झारखंडसोबतच्या या सामन्यात पृथ्वीने ३९ चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६४ धावा केल्या. ज्याच्या मदतीने मुंबईने झारखंडवर विजय मिळवला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा