सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा हल्ला, दोन जवान शहीद

श्रीनगर, २७ नोव्हेंबर २०२०: काल संपूर्ण देश संविधान दिवस साजरा करत होता त्याचबरोबर २६/११ च्या १२ वर्ष पुर्ण झाल्याच्या स्मरणार्थ शहीदांना अभिवादन करत होता. हे सर्व घडत आसतानाच देशाच्या एका कोपर्यातून एक दुखद घटना समोर आली.

श्रीनगर परिसरात काल पुन्हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. ज्यात सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. काल श्रीनगरच्या HMT परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हा भ्याड हल्ला केला. हल्ल्यानंतर परिसरातील सुरक्षतेत आजून वाढ करण्यात आली आसून, सुरक्षा दलाने आपलं सर्च ऑपरेशन चालू ठेवलं आहे.

महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण…..

जम्मू काश्मीर च्या श्रीनगर मधे झालेल्या दहशतवाद्यी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. त्यातील एक वीर चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील आहे. यश दिगंबर देशमुख असे त्याचे नाव आसून या जवानाचे वय हे फक्त २० वर्ष होते. वर्षभराआधीच तो सैन्यात भरती झाला होता.ट्रेनिंग नंतर त्याला जम्मू काश्मीर इथं तैनात करण्यात आले होते. दहशतवाद्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्यात त्याला वीरमरण आले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा