“त्या उदय सामंतला काडीची अक्कल नाही” निलेश राणेंचा घणघणाती….

मुंबई ;१९ जुलै २०२० कोरोनाचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव बघता ठाकरे सरकारने अंतिम वर्षाच्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तर विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन पास करण्याचा सरकारचा मानस होता. पण, युजीसीने काही दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आणि तिथेच युजीसीच्या या निर्णयाचा विरोध करत युवासेनेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करत “त्या उदय सामंतला काडीची अक्कल नाही, जे आदित्य सांगणार तेच तो करणार. आदित्य ठाकरेनी असं सांगावं आमचं सरकार पडलं तरी चालेल पण आम्ही परीक्षा घेणार नाही, तरच विद्यार्थ्यांना वाटेल की हे खरं बोलतायत. अशी घणघणाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.

देशात कोरोना रूग्णांची संख्या दहा लाखांच्यावर गेली आहे. आशा वेळेत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे आहे. तर युजीसीने विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याची काहीही चिंता नाही असं युवासेनेने म्हटलं आहे.

राज्यात देखील कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यात परिक्षेवरुन चालु आसलेला या राजकारणाचा फटका हा अंतिमवर्षाच्या लाखो विद्यार्थांना बसत आसल्याचे दिसत आहे. अश्या राजकीय परिस्थितीमुळे विद्यार्थी देखील परिक्षा होणार की नाही या गोंधळात पडले आहेत.तर लाखो विद्यार्थांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

“त्या उदय सामंतला काडीची अक्कल नाही” निलेश राणेंचा घणघणाती….

कोरोनाचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव बघता ठाकरे सरकारने अंतिम वर्षाच्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.तर विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन पास करण्याचा सरकारचा मानस होता.पण युजीसीने काही दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या.आणि तिथेच युजीसीच्या या निर्णयाचा विरोध करत युवासेनेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करत “त्या उदय सामंतला काडीची अक्कल नाही, जे आदित्य सांगणार तेच तो करणार.आदित्य ठाकरेनी असं सांगावं आमचं सरकार पडलं तरी चालेल पण आम्ही परीक्षा घेणार नाही, तरच विद्यार्थ्यांना वाटेल की हे खरं बोलतायत. अशी घणघणाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.

देशात कोरोना रूग्णांची संख्या दहा लाखांच्यावर गेली आहे.आशा वेळेत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे आहे.तर युजीसीने विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याची काहीही चिंता नाही असं युवासेनेने म्हटलं आहे.

राज्यात देखील कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.त्यात परिक्षेवरुन चालु आसलेला या राजकारणाचा फटका हा अंतिमवर्षाच्या लाखो विद्यार्थांना बसत आसल्याचे दिसत आहे.अश्या राजकीय परिस्थितीमुळे विद्यार्थी देखील परिक्षा होणार की नाही या गोंधळात पडले आहेत.तर लाखो विद्यार्थांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा