चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरवर झाला पलटी; तिघांचा जागीच मृत्यू

लातूर, २ फेब्रुवारी २०२४ : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जरी येथे झालेल्या कंटेनर मोटरसायकलच्या विचित्र अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कृष्णा अर्जुन जाधव (वय ३०), त्याची काकू कस्तुरबाई परमानंद जाधव (वय ४०) आणि अक्षरा किशन जाधव (वय ५०) असे या अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत. कृष्णा आणि त्याची चुलती दूध आणण्यासाठी मोटरसायकलवरुन शेताकडे निघाले होते तर अक्षरा प्रत: विधीसाठी गावाबाहेर निघाल्या होत्या. दरम्यान कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि त्याने प्रथम अक्षरा जाधव यांना धडक दिली. हा अपघात पाहून थोड्या अंतरावर मोटरसायकल थांबविलेल्या कृष्णा जाधव आणि कस्तुरबाई जाधव यांच्या अंगावर कंटेनर येऊन पलटी झाला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा अपघात पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. या अपघातामुळे उदगीर निलंगा रस्त्यावर वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान निलंगा पोलीस घटनास्थळी दाखल होत वाहतूक कोंडी दूर केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेमुळे झरी गावावर शोककळा पसरली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अहिल्या कसपटे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा