नेपाळ मधील भारतीय दूतावासाने महात्मा गांधींची १५१ वी जयंती केली साजरी

काठमांडू, ३ ऑक्टोबर २०२० नेपाळमध्ये भारतीय दूतावासाने महात्मा गांधींची १५१ वी जयंती साजरी केली. काठमांडू येथील दूतावासाच्या आवारात असलेल्या बापूंच्या पुतळ्यास नेपाळमधील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्र यांनी पुष्पांजली वाहिली.

भारतीय दूतावासाने रुग्णवाहिका आणि स्कूल बस देण्याची परंपरा सुरू ठेवत आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रात कोणताही नफा न ठेवता काम करणा-या संस्थांना ४१ रुग्णवाहिका व सहा शाळा बस विविध शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांना दिल्या. या संस्था दुर्गम जिल्ह्यांसह नेपाळमधील ३० जिल्ह्यांमध्ये पसरल्या आहेत.

कोविड -१९ या साथीच्या आजाराशी लढण्यासाठी नेपाळच्या प्रयत्नांची पूर्तता करीत भारतीय दूतावासाने प्रवासी व्हेन्टिलेटर, ईसीजी आणि ऑक्सिजन मॉनिटर्स आणि नेपाळमधील आपत्कालीन वैद्यकीय उपकरणांसह प्रगत रुग्णवाहिका भेट दिल्या.

१९९४ पासून भारतीय दूतावासाने सुमारे ८२३ रुग्णवाहिका भेटवस्तू म्हणून दिल्या आहेत. दूतावासानं आतापर्यंत नेपाळमधील शाळांना १६० बसगाड्या भेट दिल्या असून त्यामध्ये आज नेपलच्या सहा जिल्ह्यांमधील शैक्षणिक संस्थांना भेट देण्यात आल्या आहेत. आजच्या काळात रुग्णवाहिका व स्कूल बस पुरविणे हे नेपाळच्या आरोग्य सेवा, विशेषत: आपत्कालीन वैद्यकीय सेवा मजबूत करण्याच्या प्रयत्नांना सतत पाठिंबा दर्शविते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या ठिकाणी सहजपणे जाणे सोपे होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी