गोल पोस्ट हवामान पुढील आठवड्यापासून सुरू होईल मान्सूनच्या परतीची वाटचाल…

पुढील आठवड्यापासून सुरू होईल मान्सूनच्या परतीची वाटचाल…

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर २०२०: पुढच्या आठवड्यात नैऋत्य मॉन्सून राजस्थानहून परतण्यास सुरवात होईल. यासह सुमारे चार महिने सुरू असलेला पावसाळा संपेल. चालू खरीप हंगामात पिकांची विक्रमी पेरणी झाली असून, यंदाच्या तुलनेत भरघोस उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण ग्राहकांच्या मागणीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

जून-सप्टेंबरच्या कालावधीत आतापर्यंत पाऊस सामान्यपेक्षा ८ टक्क्यांनी जास्त झाला आहे, तथापि, या चार महिन्यांत पाऊस फार असामान्य राहिला आहे. जुलै महिन्यात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा ९.७% होता आणि ऑगस्टमध्ये ३१% पेक्षा जास्त होता. जूनमध्ये पाऊस सामान्यपेक्षा १७.६% होता. ऑगस्टमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडल्यानंतर उत्तर भारतात पाऊस या महिन्यात बर्‍यापैकी कमी राहिला. ऑगस्टमध्ये या भागात पाऊस कमी झाला होता आणि आतापर्यंत सामान्यपेक्षा ५३% कमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यात परतीची सुरूवात होत असल्यानं या भागात कोरडा हंगाम सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

हवामान खात्यानं सांगितलं की, “पश्चिम राजस्थान व त्याच्या आसपासच्या भागातून २८ सप्टेंबरच्या सुमारास नैऋत्य मॉन्सून परतीसाठी परिस्थिती अनुकूल असण्याची शक्यता आहे.” हिंदी महासागरावरील ‘ला नीना’च्या स्थिती मूळं मॉन्सूनची परतीची वाटचाल लांबणीवर पडली. शास्त्रज्ञांनी सांगितलं की, १७ सप्टेंबरच्या सामान्य तारखेच्या तुलनेत मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचं काम लांबणीवर पडलं.

आयएमडी’नं म्हटलं आहे की, मान्सून परतल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांसाठी त्यांनी रेड अलर्ट जारी केलाय, तर उत्तरेकडील राज्यांना ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

कृषी मंत्रालयाला आशा आहे की खरीप किंवा उन्हाळी हंगामात विक्रमी पीक शेतकऱ्यांना मिळंल. यामुळं ग्रामीण भागातील मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे, कारण शेतकरी सतत दुसर्‍या मोठ्या पिकाची कापणी करतील. यामुळं शेतकर्‍यांचं उत्पन्न वाढेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version