हे आरक्षण टिकले पाहिजे हीच सरकारची भूमिका: अशोक चव्हाण

मुंबई, दि. ४ जुलै २०२०: मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ विधी तज्ज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात आणि महत्वाचे म्हणजे अशोक चव्हाण उपस्थित होते.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, “मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. हे आरक्षण टिकले पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल, त्या दृष्टीने शासनाने पूर्ण तयारी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ७ जुलै रोजी सुनावणी आहे. त्यादृष्टीनेही योग्य ती पावलं आम्ही उचलत आहोत.”

मराठा आरक्षण राज्य सरकारने दिले आहे. आत्तापर्यंतची ही सहावी बैठक होती. ७ जुलै रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. शासनाच्या वतीने आपली बाजू त्या दिवशी नीट मांडली पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे. खासदार संभाजी राजे यांनाही त्याची कल्पना देण्यात आली आहे. तसेच शरद पवार यांनाही आजच्या बैठकीत काय काय चर्चा झाली ते स्पष्ट करण्यात आले आहे, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा