मेळघाटात मालवाहक पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, तर १८ जण जखमी

अमरावती, ४ ऑगस्ट २०२२: सातपुड्यातील धारणी तालुक्यातील ग्राम सुसरदा येथे मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरत असून, याठिकाणी जवळपासच्या काही परिसरातील भाजी विक्रेते या ठिकाणी भाजी विक्रीकरिता येत असतात.

धारणी तालुक्यातील ग्राम सुसरदा येथे मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरत असतो.
या ठिकाणी अकोट शहर, अंडगाव, हिवरखेड आणि आसपासच्या भागात भाजी विक्रीकरिता येत असतात. ३ ऑगस्ट रोजी बाजार आटोपून येत असताना संध्याकाळी पाचच्या सुमारास राणेगाव घाटात पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात झाला.

या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना परिसरातील नागरिकांनी धारणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासन व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातात जखमी आणि मृतकांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे. या संदर्भातील माहिती मिळू शकलेली नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी: विजय सपकाळ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा