मुंबईत क्रीडा संकुलला टिपू सुलतानचं नाव, भाजप, बजरंग दलाकडून आंदोलनं सुरूच…

23

मुंबई, 27 जानेवारी 2022: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बुधवारी भारतीय जनता पक्ष (भाजप), विश्व हिंदू परिषद, विहिंप आणि बजरंग दलाने मालवणीत टिपू सुलतानच्या नावानं असलेल्या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनापूर्वी जोरदार निदर्शने करून अटकेची घोषणा केली. हे क्रीडा संकुल महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी आपल्या आमदार निधीतून बांधलंय. क्रीडा संकुलाला सदर वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल असं नाव देण्यासाठी भाजप आणि हिंदू संघटना कालपासून आंदोलन करत आहेत.

बुधवारी सायंकाळी अस्लम शेख स्वतः या संकुलाचं उद्घाटन करणार होते. ते मुंबईचे प्रभारी मंत्री देखील आहेत, परंतु उद्घाटन समारंभ सुरू होण्यापूर्वीच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी संकुलाबाहेर गोंधळ घातला. कोणत्याही प्रकल्पाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक टिपू सुलतानचं नाव देऊ देणार नाही, असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जुलमी राजाचं असं नामकरण म्हणजे त्या अत्याचाराचा गौरव करत आहोत, असं म्हटलंय.

हे क्रीडा संकुल बांधणारे मंत्री अस्लम शेख सांगतात की, टिपू सुलतान हा एकमेव राजा होता जो इंग्रजांविरुद्ध लढताना मारला गेला. हे सत्य ओळखून आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये चौक, रस्ते आणि इतर आस्थापनांना टिपू सुलतानची नावं देण्यात आली आहेत. त्यामुळं आता या विरोधाचे कारण नाही. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात की, दोन दिवसांपूर्वी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं उद्घाटन करणाऱ्या पंतप्रधानांनी टिपू सुलतान यांना शहीद म्हणत त्यांचा गौरवही केला होता. टिपू सुलतानच्या सैन्यात वापरलेले दोन सिंहांचं प्रतीक सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या आझाद हिंद फौजेच्या ध्वजावर आणि गणवेशावर वापरले होतं. त्यामुळं भाजपने निवडणुकीतील फायद्यासाठी ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करू नये.

जाणून घ्या, काय आहे प्रकरण आणि का होत आहे निषेध

मुंबईतील मालवणी परिसरात प्रजासत्ताक दिनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आलं. हे नाव म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय. मालवणी हा अस्लम शेख यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ते राज्य सरकारमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री असलम शेख यांनी आपल्या आमदार निधीतून हे क्रीडा संकुल बांधून त्याला ‘सदर वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ असं नाव दिलं, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी हा नक्कीच मुंबईची शांतता भंग करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. ते थांबवलं पाहिजे. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथल्या प्रकल्पाला एका रानटी हिंदुद्वेषाच्या नावाने नाव देणे निंदनीय आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा संदर्भ देत महाराष्ट्र भाजपनेही या संकुलाचं छायाचित्र ट्विट केलंयं. भाजपने लिहिले की, ‘ज्याच्या नावावर तुम्ही क्रीडा संकुलाचे नाव ठेवलं, त्याने हजारो हिंदूंची हत्या केली आणि मंदिरं उद्ध्वस्त केली. आता शिवसेना त्यांना पसंत करू लागलीय का?

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा