गोल पोस्ट राजकारण आज काँग्रेसचा ‘महंगाई पर हल्ला बोल’

आज काँग्रेसचा ‘महंगाई पर हल्ला बोल’

नवी दिल्ली, ४ सप्टेंबर २०२२: महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर ( जीएसटी ) विरोधात आज रामलीला मैदानावर काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे इतर नेते ‘ महंगाई पर हल्ला बोल ‘ या रॅलीला संबोधित करतील.

७ सप्टेंबरपासून विरोधकांनी कन्याकुमारी ते काश्मीर ३,५०० किमीच्या ‘ भारत जोडो यात्रे ‘ च्या अगोदर ही रॅली आयोजित केली आहे, जिथे राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारीच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि जातीय सलोखा वाढवण्यासाठी देशभर प्रवास करतील.

‘भारत जोडो यात्रा’ हा काँग्रेस पक्षाचा आतापर्यंत सर्वात मोठा जनसंपर्क कार्यक्रम आहे. जिथे पक्षाचे नेते तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील, महागाई आणि बेरोजगारी सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आणि त्यावर चर्चा केली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version