त्रिपुरात मुलीला सामूहिक अत्याचारानंतर जिवंत जाळले

त्रिपुरा : हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट पसरली असतानाच आता त्रिपुरातही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्रिपुरा येथील शांती बझार परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या प्रियकर आणि त्याच्या मित्राने अपहरण करून सामूहिक तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीला जाळले.

याबाबत संबंधित तपास अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित मुलीच्या प्रियकराने तिला मागील दोन महिन्यांपासून खंडणीसाठी बंदीस्त करून ठेवले होते. जेव्हा पीडित मुलीचा मृत्यू झाल्याचे समजले. तेव्हा रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली आणि त्यांनी आरोपी आणि त्याच्या आईवर हल्ला केला.
तसेच पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की’ अजॉय नावाच्या व्यक्तीने मुलीला सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, मुलीचे कुटुंबीय शुक्रवारपर्यंत १७ हजार रुपयेच जमा करू शकले. त्यामुळे अजॉयने मुलीला पेटवून दिले.

याबाबत दक्षिणी त्रिपुराचे पोलिस अधीक्षक जलसिंह मीणा यांनी सांगितले, की या प्रकरणातील मुख्य आरोपी अजॉयला रुग्णालायातून अटक करण्यात आली आहे. पुढील पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सोशल मीडियावर झाली ओळख…
पीडित मुलगी आणि आरोपी मुलाची सोशल मीडियावर ओळख झाली होती. दिवाळीनंतर ती त्यासोबत पळून गेली. जेव्हा तिने लग्नासाठी त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्याने तिच्या कुटुंबियांकडे पैशांची मागणी केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा