वीज बिल माफीसाठी राज्यभर धरणे आंदोलन

मुंबई, ४ ऑगस्ट २०२० : ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या राज्यातील घरगुती वीज ग्राहकांचे लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी राज्यभर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालयासमोर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच वीज बिल माफीच्या रकमेची राज्य सरकारने भरपाई करावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.राज्य सरकारकडून लॉकडाऊन काळातील वीज बिलात २० ते ३० टक्के सवलत देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

१५ ऑगस्ट रोजी होणा-या ग्रामसभेत वीज बिल माफीचा ठराव करून त्याची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवावी असेही आवाहन संघटनेने केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा