१ एप्रिल २०२० पासून सरकारी कर्मचार्‍यांना सक्तीची सेवा निवृत्ती – व्हायरल चेक

सरकारी कर्मचार्‍यांच्या बाबतीत आपल्याला रोज नवनवीन बातम्या ऐकायलाल मिळत आहेत. सध्या काही दिवसानसून एक मेसेज सोशल मीडिया वर फिरत आहे. या मध्ये संगितले जात आहे की, १ एप्रिल २०२० पासून सरकारी कर्मचार्‍यांना सक्तीची सेवा निवृत्ती करण्यात येणार आहे. या बाबतचे मेसेज, फोटो सोशल मीडिया वर पसरत आहेत, या मळे कर्मचार्‍यां मध्ये भीती चे वातावरण पसरले आहे. सरकारी कर्मचार्‍यां मध्ये खळबळ उडाली आहे कारण करमिक व प्रशिक्षण विभागणे हा निर्णय घेतला असल्याचे या मेसेज मध्ये संगितले जात आहे. . कर्मचार्‍यांच्या सकत्तीच्या निलंबांनाचा ठराव यात पास झाल्याचे सांगण्यात आले आहे. नोकरीचे ३३ वर्ष पूर्ण व वयाचे ६० वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाकणाचा निर्णय सरकणे घेतला असल्याचे ही यात संगितले जात आहे.

सरकारने याचा खुलासा केला आहे. मंगळवारी सरकारी सूत्रांनी याचा खुलासा केला आहे. त्यांनी असे म्हंटले आहे की, सरकारनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अवहनही त्यांनी या वेळी केले आहे. तसेच अश्या प्रकारचा कोणताही प्रस्ताव विचारात नसल्याचे त्यांनी या वेळी पाष्ट केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा