विषारी दारु पिल्याने २१ जणांचा मृत्यू……

अमृतसर, १ ऑगस्ट २०२० : पंजाबमध्ये विषारी दारु पिल्याने २१ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यप्रेमींसाठी दारू हि जीव का प्राण आहे.त्यातच आता त्यांची हि दारु खरंच त्यांच्या जीवावर उठल्याची घटना पंजाब मध्ये घडली आहे.

पंजाबच्या अमृतसरमध्ये बाटला आणि तरनतारन या गावात हि घटना घडली आहे. पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहिती नुसार या घटनेत मुच्छल गावात २ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बटाला शहरातही २ जणांचा मृत्यू झाला. बटाला शहरात तर आज आणखी ५ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर तरनतारन येथे देखील ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच या घटनेमुळे संपुर्ण पंजाब शहर हादरलं असून या प्रकरणानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यानीं विषारी दारुच्या ठिकाणावर छापे मारण्याचे आदेश दिले आहेत.तर पोलिसंनी या प्रकरणाची तातडीने तपास करत १ महिलेसह काही जणांना विषारी दारु बनविण्याचा आरोपाखाली अटक केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा