आता चित्रा वाघ गप्प का ? उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले

मुंबई, ७ जानेवारी २०२३: राज्यात चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद चांगलाच रंगू लागला आहे. उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून या चर्चेस सुरुवात झाली. ती वापरत असलेल्या कपड्यांमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ आणि तिच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. एवढेच
नाही तर चित्र वाघ यांनी महिला आयोगाकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. त्यानंतर मला विनाकारण त्रास दिला जात आहे, असे म्हणत उर्फीने देखील महिला आयोगाकडे दाद मागितली.

काही दिवसांपूर्वी उर्फीने समाज माध्यमांद्वारे सुरू असलेल्या वादामुळे तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यामुळे या वादाने एक वेगळेच वळण घेतले होते. आज पुन्हा एकदा उर्फी जावेदने इंस्टाग्राम स्टोरी ठेवत चित्र वाघ यांना प्रश्न केला आहे. झाले असे की, भाजपच्या तमिळनाडू राज्यातील नेत्या आणि अभिनेत्री गायत्री रघुराम यांनी भाजप पक्ष सोडला. भाजप पक्षात महिला सुरक्षित नाही, म्हणून मी पक्ष सोडत आहे असे कारण गायत्री यांनी पक्ष सोडताना दिले आहे. आणि याच बातमीवरून उर्फी जावेदने चित्र वाघ यांना पुन्हा एकदा डिवचले.

चित्र वाघ यांना महिला आयोगाने समर्थन दिले नसून, उलट चित्रा वाघ यांनाच महिला आयोगाकडून नोटीस देण्यात आल्याने चित्रा वाघ सध्या शांत आहेत. परंतू उर्फीने इंस्टाग्राम स्टोरीवर गायत्री रघुराम यांची बातमी शेअर करत, ‘यांचे तर कपडे सुद्धा चांगले आहेत. तुमच्याच पार्टीतील लोकांमुळे हे झाले आहे. जिथे आवाज उठवायला हवा तिथे आवाज नाही उठवणार. चित्रा वाघ तुम्ही गप्प का?’ असा प्रश्न विचारला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा