‘विजय दिवसानिमित्त’ राजनाथ सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण

नवी दिल्ली, १६ डिसेंबर २०२२ : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवसानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केले. तत्पूर्वी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि भारतीय नौदलाचे उपाध्यक्ष व्हाइस अॅडमिरल एसएन घोरमाडे यांनीही राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केले.

पन्नास वर्षांपूर्वी, हा दिवस दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी शरणागतीचा दिवस होता. कारण पाकिस्तानी लष्कराच्या ९३,००० सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शस्त्रे टाकली होती पण परिणामी बांगलादेश, पूर्वी पूर पाकिस्तानची मुक्तता झाली. हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १६ डिसेंबर १९७१ रोजी, लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी, पूर्व पाकिस्तानचे मुख्य मार्शल लॉ प्रशासक आणि पूर्व पाकिस्तानमध्ये असलेल्या पाकिस्तानी लष्कराचे कमांडर यांनी आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली.

गुरुवारी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाचे स्मरण म्हणून राष्ट्रीय राजधानीतील आर्मी हाऊसमध्ये ‘विजय दिवसाच्या’ पूर्वसंध्येला ‘अॅट होम’ रिसेप्शनला हजेरी लावली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘विजय दिवसच्या’ पूर्वसंध्येला आर्मी हाऊसमध्ये ‘अॅट होम’ रिसेप्शनला हजेरी लावली, असे राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हैंडलने पोस्ट केले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. १९७१ च्या युद्धात विजय मिळवून दिलेल्या सशस्त्र दलांचे शौर्य भारत कधीच विसरणार नाही,असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा