१० वी, १२ वीचे वर्ग ऑगस्टपासून सुरु……

मुंबई, अमरावती, १० जुलै २०२० : राज्यातील कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे यंदाचे शालेय शिक्षण सुरु होण्यास अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करुन शिक्षण सुरु करणे गरजेचे आहे. यासाठी १० वी आणि १२ वीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर २१ जुलैपासून ५ वीचे वर्ग देखील ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे, त्याचबरोबर पहिली, दुसरीच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर बंदी करण्यात अली आसून ज्या शाळा सक्तीने शुल्‍क वसुली करन अश्या शाळांवर कारवाई करण्यात येतील, असा इशारा देखील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिला.

अमरावती मध्ये गुरुवारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरु करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीच्या वेळी उपसंचालक अंबादास पेंदोर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांच्या सोबत पाचही जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करणे आवश्यक आहेत. खासगी शाळां मध्ये सर्व वर्गांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. या मुळे खासगी शाळा आणि शासकीय शाळा मधील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. या वरील उपाय योजना म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरु करणे आवश्यक आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी,बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील किमान एक शाळा सुरु करण्याचे नियोजन करावे. शाळा सुरु करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करुन इतरही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात यावा. यासाठी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांची मदत करावी, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

तसेच शासनाने १ ली आणि २ री ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. काही शाळा मध्ये फक्त शुल्क वसुल करण्यासाठी वर्ग घेत असल्याचे दिसत आहे. मात्र अजून पर्यंत याबाबत एकाही शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच काही शाळा विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्यासाठी देखील सांगत आहेत, परवानगी नसताना देखील काही शाळेतच पुस्तक विक्री करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर तक्रार प्राप्‍त झाल्यास शाळा व्यवस्थापनासह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा