धुळे सोलापुर महामार्गावरील कार-दुचाकी अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यु

वडीगोद्री, अंबड, १५ मार्च २०२४ : कारने दुचाकीला मागुन जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना काल सकाळी ८:३० च्या दरम्यान धुळे – सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे घडली आहे. अभिषेक ज्ञानेश्वर आटोळे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील रहिवासी होता.

सदर तरूण हा दुचाकीवर वडीगोद्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील २५ वर्षीय तरुण अभिषेक ज्ञानेश्वर आटोळे हा जागीच ठार झाला आहे.

सदर मयत तरुणाचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी पाचोड ग्रामीण रूग्णालयात वडीगोद्री येथील गावकरी व मयताच्या नातेवाईकानी गर्दी केली होती. नंतर वडीगोद्री येथे मयत तरुणाचे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा