India’s Greatest Spy Ravindra Kaushik (The Real Black Tiger): जेव्हा जेव्हा देशासाठी बलिदान देणाऱ्या योद्धांची नाव घेतली जातात तेव्हा एक नाव आठवणीने घ्यावं लागतं, ज्या नावाने पाकिस्तानचं सैन्य ही थरथर कापतं, जे नाव धर्म- जात – पंथ याच्याही पलीकडे देशभक्तीच प्रतीक म्हणून ओळखलं जात. मी बोलतीय रवींद्र कौशिकबद्दल…
रवींद्र कौशिक एक असा हिरो जो इतिहासाच्या कुठल्याच पानावर नाहीये. देशासाठी मित्र, परिवार, सन समारंभ या सगळ्या गोष्टींचा त्यान त्याग केला तरी शेवटची इच्छा असून सुद्धा स्वतःच्या देशात त्यांना परत येता आले नाही. ही गोष्ट आहे एका देशासाठी केलेल्या बलिदानाची, ही गोष्ट आहे परत एका आईने आपल्या मुलाला देशासाठी गमावल्याची. चला पाहूया कहाणी ब्लॅक टायगरची आपल्या भारतातला सर्वोत्कृष्ट स्पाय ब्लॅक टायगर त्याने पाकिस्तानात तब्बल आठ वर्ष राहून भारताला महत्वाच्या बातम्या पुरवल्या होत्या.
त्यांचा हा प्रवास सुरू कसा झाला? पाहुयात
रवींद्र कौशिक,जन्म राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील तारीख ११ एप्रिल १९५२. त्यांचे वडील J. M. कौशिक हे एक इंडियन एअर फोर्स ऑफिसर होते. त्यांनी १९७१ रोजी झालेल्या इंडिया पाकिस्तान वॉरमध्ये इंडियन एअर फोर्स ऑफिसर म्हणून भारतासाठी काम केल होत आणि म्हणूनच भारत पाकिस्तान युद्ध हे रवींद्र कौशिक यांनी अगदी जवळून पाहिले होते.
रंगभूमी ते रणभूमी..
देशासाठी काही तरी करून दाखवायची इच्छा ही रवींद्र कौशिक मधे आधी पासूनच होती. पण हा स्पाय रंगभूमीवरचा मोठा कलाकारही होता बर , तर त्यांचा हा रंगभूमी ते रणभूमी पर्यन्त चा प्रवास ही आज जाणून घेवूयात, रवींद्र कौशिक यांना नाटकात प्रचंड रस होता नव नवीन भूमिका ते एकदम उत्कृष्ट पणे सादर करत. असच एकदा लखनऊ थिएटर फेस्टिवल मध्ये २१ वर्षाचा असताना रवींद्र यांनी भाग घेतला होता. त्या नाटक ते एक मिलिटरी ऑफिसरची भूमिका सादर करत होते. ती भूमिका तिकडे उपस्थित असलेल्या RAW एजेंटने पहिली आणि पाहताक्षणी त्यांना ती भूमिका एवढी आवडली की त्यांनी रवींद्र कौशिकला दिल्लीला बोलवून घेतले आणि तिथून सुरू झाला पाकिस्तानला जाण्याचा प्रवास.
थेट दिल्ली ते पाकिस्तान..
RAW एजेंटने दिल्लीला रवींद्र यांना बोलवून घेतले आणि त्यांना इंडियन स्पाय होण्यासाठी विनंती केली. रवींद्र कौशिक यांनी एक मिनिटपण विचार न करता सरळ होकार दिला. वय वर्ष एकवीस असताना देखील एवढा मोठा निर्णय त्यांनी फक्त देशासाठी घेतला होता. तिथून पुढे त्यांना २ वर्षाची ट्रेनिंग दिली गेली. या ट्रेनिंग मध्ये त्यांना उर्दु बोलण्या पासून ते शस्त्र चालवण्या पर्यंत सगळ शिकवले गेले आणि आता रवींद्र कौशिक हे नाव नबी अहमद शाकिर झाले होते.
१९७५ मधे रवींद्र कौशिक ऊर्फ नबी अहमद शाकिर हे वयाच्या २३ वर्षी पाकिस्तानमध्ये आले. पाकिस्तानात आल्या आल्याच त्यांनी कराची युनिव्हर्सिटी मधून L.L.B चे शिक्षण घेतले. LLB डिग्री संपताच ते पाकिस्तान मिलिटरीत भरती झाले आणि बघता बघता ते पाकिस्तान मिलिटरीचे मेजर झाले. अर्थात हे सगळ त्यांनी भारतीय RAW एजंट्सच्या परवानगीनेच केल. आता पाकिस्तान मिलिटरीचा मेजर झाल्या मुळे सगळ्या लोकांचा आदर आणि विश्वास नबी अहमद शाकिरसाठी वाढला होता.याचा फायदा हा भारताला खूप मोठ्या प्रमाणात झाला. पाकिस्तानचा मेजर असल्या मुळे पाकिस्तान, हा कोणता हमला भारतावर करणार आहेत ही बातमी भारतात आधीच पोचत होती आणि अश्या बऱ्याच न्यूज मुळे भारताने पाकिस्तानचे प्लॅन हे फोल केले. पाकिस्तानमध्ये असताना नबी अहमद यांना एका अमानत नावाच्या मुली वर प्रेम झाले आणि त्याचं लग्न देखील झाले. लग्नाच्या काही वर्षात त्यांना एक मुलगा देखील झाला पण अजून सुद्धा असं म्हणतात की हे लग्न करायचा निर्णय हा एक प्लॅन होता. कारण अमानत ही एक पाकिस्तान मिलिटरीमध्ये काम करणाऱ्या एका टेलरची मुलगी होती. हे प्रेम होत का पाकिस्तानात अजून टिकून राहायची कल्पना? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे
कसे पकडले गेले रवींद्र कौशिक!
RAW ने पाकिस्तानात एक एजंट रवींद्र कौशिक सोबत कॉन्टॅक्ट होण्यासाठी पाठवला होता इनायत मसीह नावाचा. मसिहला पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या जॉइंट काउंटर-इंटेलिजन्स ब्युरोने पकडले आणि चौकशीदरम्यान, मसिहने रवींद्र कौशिकची खरी ओळख आणि त्याची RAW एजंट म्हणून असलेली भूमिका उघड केली. संध्याकाळी एका पार्क मध्ये मसिह आणि नबी शाकीर ऊर्फ कौशिक हे भेटणार होते ही बातमी देखील पाकिस्तान ISI ला दिली आणि त्याच संध्याकाळी रवींद्र कौशिक यांना पाकिस्तानात अटक झाली.
रवींद्र कौशिक हे स्वतःची काही चूक नसताना देखील १९८३ मधे पकडले गेले. रवींद्र कौशिक यांना १९८५ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा देखील ठोठावली होती, पण नंतर ती शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. त्यांना सियालकोटला दोन वर्षे कठोर छळ सहन करावा लागला. त्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. पुढची १६ वर्षे त्यांनी पाकिस्तानमधील विविध तुरुंगांमध्ये, जसे की सियालकोट, कोट लखपत आणि मियांवाली,या ठिकाणी काढावी लागली एवढा छळ हून सुद्धा भारताली कोणतीच महत्त्वाची माहिती त्यांनी पाकिस्तानला दिली नाही आपल्या शेवटच्या श्वासा पर्यंत भारतात येण्याची ओढ त्यांना लागून राहिली होती. भारतात आपल्या परिवाराला ते पत्र लिहायचे. या पत्रात त्यांनी पाकिस्तानात त्यांना होणाऱ्या त्रासा बद्दल लिहिले आणि भारतात पुन्हा येण्याची विनंती देखील केली.
भारत सरकाने त्या वेळी आपला रविंद्रशी काही संबंध नाही असे सांगितले. हा सगळा प्रकार ऐकून रवींद्र कौशिक यांच्या वडलांचे हार्ट अटॅक ने निधन झाले पण त्यांचा मोठे भाऊ राजेश्वरनाथ कौशिक आणि त्यांची आई अमलादेवी भारत सरकार कडे वारंवार आपल्या लेकाला सोडवण्याची विनंती करत होते. एका पत्रात रवींद्र कौशिक यांनी आपल्या परिवाराला “क्या भारत जैसे बढे देश केलिए क़ुरबानी देने वालों को यही मिलता है?” असं लिहिले होते. हे वाक्य वाचून आपल्या लक्षात येते की रवींद्र यांना भारत सरकार कडून किती दुर्लक्षित केले गेले होते. आपल्या ब्लॅक टायगर ने अखेरचा श्वास हा २१ नोव्हेंबर २००१ सेंट्रल जेल mianwali मध्ये tb मुळे घेतला. एवढच नव्हे तर त्याचं शवदेखील भारतात नाही आले. त्यांना पाकिस्तानमधेच पुरले गेले आणि भारताच्या एका unsung hero चा इतिहास देखील त्या दिवशी पाकिस्तानात पुरला गेला.
रवींद्र कौशिक भारताचा forgotten स्पाय..
The telegraph नावाच्या एका वृत्त पत्रात पहिल्यांदा dalip Singh यांनी लिहिलेले रवींद्र कौशिक यांच्या नावाने एक आर्टिकल 29 डिसेंबरला 2002 ला पब्लिश करण्यात आलं या आर्टिकलचं टायटल होते ‘India’s forgotten spy’ म्हणजे भारताचा हरवलेला स्पाय या आर्टिकलमधे त्यांनी त्यांच्या कुटुंबाची धडपड लिहिली आहे. कसं आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि रवींद्र यांची एक ओळख भारतात निर्माण करण्यासाठी ते झगडत होते. खरच आपल्या देशासाठी प्राणपणाला लावले तरी आपल्याच देशात एक ओळख निर्माण करण्या साठी परिवाराला एवढी धडपड करावी लागली. ही गोष्ट आपल्यासाठी खरच लाजिरवाणी आहे.ही गोष्ट ऐकून अंगावर काटा येतो, एका आईला आपल्या मुलाची शेवटची भेट देखील घेता येऊ नये, देशासाठी प्राण पणाला लावले पण शेवटपर्यंत आपल्या मातृभूमीला स्पर्श नाही करता आला. हा कसला न्याय आहे पण या गोष्टीतून आपल्या एक लक्षात येते की सगळे हिरो हे वर्दी घातलेले नसतात तर असे असंख्य हिरो आहेत ज्यांची शौर्य गाथा रवींद्र कौशिक सारखी कुठे तरी पुरली गेली आहे, जी इतिहासाच्या पानांवर नक्कीच आली पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी;जुई काळे