नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021: 15 डिसेंबरपासून भारतातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली.
कोरोनामुळं होती उड्डाणं बंद
गेल्या वर्षी, कोरोनामुळं, 23 मार्च रोजी देशातील नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्यात आली होती. तथापि, वेळोवेळी अनेक देशांशी एयर बबल करार केले गेले आणि त्यांच्या दरम्यान मर्यादित हवाई सेवा सुरू करण्यात आली. सध्या भारताचा सुमारे 28 देशांशी एयर बबल करार आहे.
भारताचा 28 देशांशी एअर बबल करार आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, केनिया, भूतान आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे जिथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत.
कोरोनाच्या नवीन वेरिएंटबद्दल चिंता
तत्पूर्वी, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या B.1.1.529 या नवीन वेरिएंटबाबत चिंता व्यक्त केली होती. अलीकडील व्हिसा निर्बंधांमध्ये दिलेल्या सवलतीच्या संदर्भात, त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वेरिएंटया झपाट्याने प्रसारामुळे सतर्क राहण्याचे पत्र देखील पाठवले होते. बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये या वेरिएंटची पुष्टी झालेली प्रकरणे आढळून आली आहेत.
एअर बबल करार म्हणजे काय
एअर बबल करारांतर्गत, दोन देशांदरम्यान केवळ निवडक एअरलाइन्सद्वारे विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवली जातात. तेथे प्रवास करण्यासाठी अनेक कडक निर्बंधही आहेत. तथापि, नुकतेच नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की सरकार आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्य करू इच्छित आहे.
29 नोव्हेंबरपासून सिंगापूर ला फ्लाइट
या महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि सिंगापूर दरम्यान विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावर सहमती झाली होती. या अंतर्गत, ज्या लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे ते आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतील आणि त्यांना क्वारंटाईनचे पालन देखील करावे लागणार नाही. भारत आणि सिंगापूर दरम्यान 29 नोव्हेंबरपासून उड्डाणे पुन्हा सुरू होणार आहेत. विस्तारानेही याबाबत घोषणा केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे










































