अजित पवारांशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही: भुजबळ

मुंबई:  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना त्यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे ३०-३५ आमदार अस्वस्थ असल्याची माहिती दिली. तसेच राष्ट्रवादीत परत येण्याचे आवाहनही केले आहे. अजित पवार यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असंही अस्वस्थ आमदारांचे म्हणणं असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी आपला निर्णय मागे न घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, तरीही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. छगन भुजबळ यांनी देखील आज अजित पवार यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

छगन भुजबळांनी अजित पवारांना पक्षातील आमदारांच्या भावना काय आहेत याचीही कल्पना दिली असल्याचं बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील गुंतागुंतीमुळे मोठे नुकसान होऊ नये म्हणूनच राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी पक्षातील नेते शर्तीचे प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा