शेतकऱ्याचा कोरड्या विहीरीत पडून मृत्यू

अंबड, जालना २७ मार्च २०२४ : अंबड तालुक्यात शेताला वेढा करायला गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरुन त्याचा कोरड्या विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यात आज २६ मार्च रोजी घडली आहे. परमेश्वर शेषराव काळे वय ५७ असे शेतकऱ्यांचे नांव आहे.

जालन्याच्या अंबड तालुक्यातील वडिकाळा येथे आपल्या शेताला वेढा करण्यासाठी शेतकरी परमेश्वर शेषराव काळे गेले होते, तेथे त्यांनी महिनाभरापुर्वी विहीर खोदलेली आहे. या विहिरीजवळ ते गेले असता अचानकच त्याचा पाय घसरला व ते विहीरीत पडले. ते सकाळपासून घरी परत न आल्यामुळे त्यांचा मुलगा शेषनारयण काळे यांने शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत. शेवटी दुपारनंतर विहिरीजवळ गेला असता त्यांचे वडिल विहिरीत पडल्याचे कळाले. त्यांना वर काढून डाँक्टराकडे नेले आसता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केलं. याबाबत गोंदी पोलीसांना माहीती देण्यात येऊन पंचनमा करण्यात आलाय अशी माहीती मिळाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा