फलटण येथे नीरा उजवा कॅनॉल अस्तरीकरण व्हावे या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

फलटण, सातारा ९ ऑगस्ट २०२३ : फलटण येथे निरा उजवा कॅनाल चे अस्तरीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी फलटण पूर्व भागातील शेतकऱ्यांनी फलटण येथे मोर्चा काढला. या वेळी निरा उजवा कॅनाल चे अस्तरीकरण झालेच पाहिजे अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली .जर अस्तरीकरण झाले तर कॅनाल ला वेळेत व पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार असून त्यामुळे फायदा होणार आहे.

निरा उजवा कॅनाल चे अस्तरीकरण झालेच पाहिजे या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी सचिन ढोले यांना निवेदन दिले. यावेळी फलटण पूर्व भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी फलटण येथे मोर्चा काढला. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना ही या संदर्भात निवेदन दिले व त्यांच्याशी चर्चा केली.

या वेळी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शिवाजीराव शेडगे, विकास वरे, तानाजी गावडे, मनोज गावडे यांच्या सह प्रतिष्ठित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा