महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फसणारी घटना,५ जणांनी केला सामुहिक आत्याचार……

भिवंडी, ४ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीत देेखील महिलांवर मुलीवर बलात्कार होण्याचा घटना या वांरवांर घडत आहेत. तर विनयभंग सारखी किळसवाणी विकृती हि देखील सध्या मोठ्या प्रमाणावर घडत आहे. नुकतेच पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात एका कोरोनाबाधितावर आसा विनयभंगाचा प्रकार झाला होता. तर आता भिवंडीच्या एका राहनाळ गावातून बलात्कारांची घटना समोर आली आहे.

भिवंडी मधील राहनळ भागात ४२ वर्षीय महिलेवर ५ जणांनी सामुहिक बलात्काराची माणुसकिला काळीमा फासणारी धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. मैत्रिणीच्या घरातून परतत आसताना पिडितेला हवशी नराधमांनी जबरदस्तीने जंगलात घेऊन गेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. पिडिता पोलिसांना घटना स्थळी बेशुद्ध अवस्थेत आढळली.

तर अश्या धक्कादायक घटनेच्या तपासात पोलिसांनी ४ आरोपी नराधमांच्या मुसक्या आवळल्या आसून १ नराधम आरोपी हा फरार आहे. दरम्यान या अत्याचाराची नारपोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासातच या घटनेतील नराधम आरोपी माँटी कैलास वरटे ( वय २५ वर्षे ) विशाल कैलास वरटे ( वय २३ वर्ष दोघे राहणार भिवंडी ), कुमार डाकू राठोड ( वय २५ वर्ष रा.पुर्णा ) अनिल कुमार शाम बिहारी गुप्ता ( वय २८ वर्ष ) यांना ताब्यात घेऊन नारपोली पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३७६(ड), ३४१, ३२४, ३२३ प्रमाणे अटक केली असून त्यांना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा