झारखंड मध्ये नक्षलींनी उडवला पूल

झारखंड: बिशुनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पूल उद्ध्वस्त केला आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. झारखंड विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात आज १३ जागांवर मतदान होत आहे. मात्र या दरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलीस उपायुक्त शशी रंजन म्हणाले की हल्ल्यामुळे मतदानावर परिणाम झालेला नसून मतदान अजूनही सुरू असल्याची माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे.
ही निवडणूक भाजप आणि विरोधी पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप जोरदार दबाव आणत असताना, रघुबर सरकारला मात देण्यासाठी विरोधक जोरदार प्रयत्न करत आहेत. झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे, ३७,८३, ०५५ मतदार १८९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक ही पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा असल्याचे मानले जात आहे. या मुळे अशा बर्‍याच उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा