राज्यात २४ तासांत बारा हजार पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण

मुंबई, ९ ऑगस्ट २०२०: राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे १२,८२२ नवीन रुग्णांचे आढळले आहेत. तर कोरोनामुळे २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या १,४७,४८ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत सुमारे ७७,३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ११,०८१ रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी गेले आहेत.

राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३,३८,३६२ रुग्ण बरे झाले आहेत.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा