पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजप सोबत चला: अजित पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला. असा निरोप अजित पवार यांनी आमदरांकरवी शरद पवार यांना पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातल्या राजकारणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आज पाहण्यास मिळाला. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवार यांना निरोप पाठवणे हे अत्यंत सूचक मानले जात आहे.
अजित पवार यांनी बंड करुन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इतका अनपेक्षित होता की अजित पवार यांनी आज थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली.
या बैठकीत धनंजय मुंडे आले तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तसेच अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्नही अपयशी ठरले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा