सरकार येत्या दीड वर्षात 10 लाख लोकांची युद्धपातळीवर भर्ती करणार : पंतप्रधान

नवी दिल्ली, 14 जून 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ स्थितीचा आढावा घेतला आहे. पुढील दीड वर्षात युद्धपातळीवर 10 लाख लोकांची भर्ती सरकारने करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

“पंतप्रधान @narendramodi यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ स्थितीचा आढावा घेतला आणि येत्या दीड वर्षांत युद्धपातळीवर 10 लाख लोकांची भर्ती सरकारने करावी असे निर्देश दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा