घरी पाहुण्यांना बोलावताय….सावधान!

उत्तर प्रदेश, दि.१२ मे २०२० : सध्या देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. केंद्र सरकारसह प्रत्येक राज्य सरकार आपापल्यापरीने उपाययोजना करताना दिसत आहे.  अनेकजण योग्य ती काळजी घेत असून काही लोक मात्र सांगूनही ऐकत नसल्याचे समोर येत आहे.
यावर उत्तर प्रदेशामधील गाझियाबाद येथे कोरोनाच्या काळात कोणी घरी पाहुण्यांना बोलावले तर त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. तसेच वेळप्रसंगी वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. गाझियाबदमधील एका सोसायटीने हा नियम लागू केला आहे. सध्या त्याची सोशल मीडिया वर चांगलीच चर्चा आहे.

उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये कोरोनाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. त्यात राजनगर एक्सटेंशनची रिव्हर हाइट सोसायटी बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी बंद करण्यात आली आहे. या नियमांचा जो कोणी भंग करील त्यांच्यावर मोठा दंड आकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जर कोणी सदस्य सोसायटीत आपल्या नातेवाईकांना आणतील त्यांच्याकडून ११००० रुपये दंड भरावा लागेल. जर लोकांनी हा नियम पाळला नाही तर त्यांचे विद्युत कनेक्शन तोडले जाईल. हे सर्व पैसे पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केले जातील. कारण सोसायटी सतत लोकांना आवाहन करीत आहे की कोणीही बाहेरच्या व्यक्तीला सोसायटीत आणू नका. जर कोणाला कोरोनाची लागण झाली तर संपूर्ण सोसायटी सील केली जाईल.असेही यावेळी बजावण्यात आले आहे.

येथील सोसायटीत १५०० फ्लॅट्स आहेत, ४००० हून अधिक लोक येथे राहतात, जर सोसायटी सील केली तर लोकांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागले. हे सर्व पाहता सोसायटीच्या आरडब्ल्यूएने हा निर्णय घेतला आहे, घरी पाहुण्यांना बोलावले तर ११ हजारांचा दंड आणि वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे.

सध्या अनेक राज्यांत कामगार आणि लोक अडकले आहेत. त्यांना श्रमिक रेल्वेने आपल्या राज्यात मार्गस्थ करण्यात येत आहेत. त्यामुळे या लोकांवर नवे संकट उभे राहिले आहे, अशीच चर्चा सुरु झाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा