मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातपैकी तीन तलाव भरले

मुंबई, ४ जुलै २०२३: मुंबईतील संततधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत असले तरी या दरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव ८३ टक्के भरले आहेत. म्हणजे त्यांच्याकडे पुढील ३१५ दिवसांचा पाणीसाठा आहे. शहरात पावसाळा संपेपर्यंत पाणीकपात न होता ३६५ दिवस पाणीसाठा असणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडकसागर, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून ३८०० एमएलडी पाणीपुरवठा होतो.

जूनमध्ये मान्सूनचे आगमन न झाल्यामुळे तलावांमध्ये केवळ १४.८७% पाणी होते, त्यामुळे रहिवाशांना पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने मुंबई महापालिकेने १ जुलैपासून मुंबईचा पाणीपुरवठा १० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, आता चांगला पाऊस झाल्याने तुळशी, मोडकसागर आणि विहार तलाव जुलैच्या सुरुवातीला ओसंडून वाहू लागले. शहराची ५०% पाण्याची गरज भागवणारा भातसा तलाव पूर्ण होण्यासाठी थोड्याच पावसाची गरज आहे. काल एकूण पाणीसाठा १२,०५,५९८ दशलक्ष लिटर होता, जो गेल्या वर्षी १५ जुलै रोजी १२,५१,१०२ दशलक्ष लिटर होता. मुंबईला दररोज ४,२०० दशलक्ष लिटर पाणी (एमएलडी) लागते, त्यापैकी बृहन्मुंबई महानगरपालिका ३,८००० एमएलडी पाणी पुरवते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा