Shubhangi Gokhale Pandharpur Wari Criticism: सध्या आषाढी एकादशी जवळ येतेय. आणि आषाढी एकादशी म्हटल की वारकऱ्यांना ओढ लागते ती ती पंढरीच्या वारीची… पाऊले चालती पंढरीची वाट या जयघोषात असंख्य वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. आपल जीवन समृद्ध करणारी ही वारी म्हणजेच महाराष्ट्राच्या संस्कृतीच जणु एक भूषणच आहे.
या वारीचा अनुभव सामान्य वारकऱ्यांसोबतच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभागी होतात.
यंदाच्या वारीतही अनेक मराठी कलाकारांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अनेकजण या वारीत विठुरायाचे भजन-कीर्तन करत वारकऱ्यांबरोबर पायी चालत आहेत.

पण गेल्या काही वर्षांत पंढरपूरच्या वारीचं रूपच काहीसं बदललं आहे. सोशल मीडियावर फक्त फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यापुरतं काहीजण या वारीत सहभागी होतात. याबद्दल मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.आजवर अनेक नाटक, मालिका तसंच चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या शुभांगी गोखले सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात.
त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केलाय ज्यात विठ्ठल उभा असुन त्याच्यासमोर संत तुकाराम दिसत आहेत. त्यांनी अस म्हटलंय …
“खूप वर्षांपासून मनात येत रहातं वारी वर्षानुवर्षं शांतपणे, शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडी ची पाकिटं ने केळी वाटायची, मेकप करून त्या अन्नपूर्णांच्या मध्ये जबरदस्तीनी घुसून भाक-या भाजायच्या.. असे अनेक प्रकार करून क्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा.. कशासाठी?!
काही दिवसांत “काजवा महोत्सव” नामक प्रकार सुरू होईल. त्यांचा मिलनाचा काळ.. मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशानी तीला आकर्षित करत असतात.. अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत, टॉर्चेस चा प्रकाश न् बडबड करून घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची.. खूनच करायचा.. खूप लिहायचंय पण उद्विग्नतेमुळे थकले… अशा शब्दात शुभांगी यांनी आपल मतं व्यक्त केलंय..
न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर













































