मुंबई – आपल्या देशातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि उत्तम आरोग्य मिळावे, यासाठी भारत सरकार कडून ‘स्वच्छ भारत अभियान’ संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे.
मात्र, काही मंडळी आपल्या डोळ्यांसमोर कचरापेटी असतानाही रस्त्यावर कचरा फेकतात. अश्या मंडळींसाठी मराठी अभिनेता ‘सुबोध भावे’ यांनी सोशल मीडियावर एक सणसणीत ट्विट केलं आहे.
यामध्ये ट्विटमध्ये सुबोधने लिहलं कि, कचरापेटी असतानाही कोणा अज्ञात व्यक्तीने पाण्याच्या बाटल्या रस्त्यावरच फेकलेल्या आहेत. ‘जेव्हा आपण हे २० मीटरच अंतर गाठु तेव्हा आपला देश स्वच्छतेकडे वताचाल करेल.आपला देश, स्वच्छ देश’ अशा शब्दात त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. त्याच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत असून नागरिकांनी याबाबत दाखल घेणे गरजेचे आहे.असेच यावरून दिसत आहे.














































