बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र व केंद्रीय संघ अजिंक्य

मुंबई: ६५ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक सामन्यांच्या फेरीत रविवार (दि.५) झालेल्या फायनलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कर्नाटक संघावर २-१ ने मात करत बाजी मारली आहे.
यात सिंगल सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या रोहान थुल याने कर्नाटकच्या बी.एस. वैभव याच्यावर २१-७, २१-१९, २-१७ अशी मात केली आहे. तसेच तनिष्क सक्सेना याने संकेत सी.एस. याच्यावर २१-१९, २१-१ अशी मात केली. मात्र डबलच्या सामन्यात कर्नाटकच्या संघाने महाराष्ट्रावर २१-१४ , २२-२० अशी मात केली आहे. मुलींच्या सांघिक अंतिम सामन्यात केंद्रीय विद्यालयाच्या संघाने राजस्थानच्या संघावर ०-२ अशी मात करून बाजी मारली आहे.
यात सिंगल सामन्यांमध्ये मेहेरीन रिझा हिने अदिती काशनिया हिच्यावर २१-१७, २१-१४ अशी मात केली. डबलच्या सामान्यात केंद्रीय विद्यालयाने राजस्थानवर २१-१७ व २१-१४ अशी मात केली आहे.
या विजयानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महाराष्ट्राच्या विजयी संघाचे कौतुक केले. सांघिक सामने संपले असून आजपासून वैयक्तिक सामन्यांना सुरवात झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा