कोरोनाचा मृत्यूदर शून्यांवर आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे : जिल्हाधिकारी राम

पुणे, दि.१९ मे २०२० : पुणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासोबतच मृत्युदर शून्यांवर आणण्यासाठी आपल्याला नियोजन करणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय तसेच विविध खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी राम बोलत होते.

यावेळी राम यांनी सांगितले की, कोरोनावर उपचारासोबतच इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायम डॉक्टरांच्या सोबत आहे. कोरोनामुळे वाढता मृत्यूदर शून्यांवर आणण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्नशील राहू व नक्कीच यात यश मिळवू, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीस यावेळी पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. दिलीप कदम, ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, केईएम रुग्णालयाच्या डॉ. लीना शहा, डॉ. आरती लोखंडे, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. प्रदीप दळवी, डॉ. माधव भोज, भारती रुग्णालयाचे डॉ. जितेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा