राष्ट्रीय स्वराज्य सेना करणार निवडणुकीत महायुतीला मदत

पुणे, २० एप्रिल २०२४ : पुणे येथे राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर केला. पुणे येथे पत्रकार परिषद घेण्याआधी श्रीहरि बागल यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा संपूर्ण दौरा करून महाविजय २०२४ साकार करण्यासाठी सर्वांना एकत्र करुन नियोजन बद्ध काम केले आहे.

यावेळी बागल म्हणाले कि, राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा धर्म पाळणे आपले कर्तव्य आहे. आपण महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज असल्याने काही नाराज लोकांनी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्ष लोकसभा २०२४ निवडणूक स्वबळावर लढणार असा संभ्रम निर्माण केला होता. तो संभ्रम दूर करून पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांच्या चिन्हावर कोणताही उमेदवार लोकसभा निवडणूक २०२४ लढवणार नाही .राज्यात अनेक ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार असताना पक्षाने स्वतः निवडणूक न लढवता महायुतीचे काम करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत तिसऱ्या वेळेस पंतप्रधान होण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचा महाविजय २०२४ साकार करण्यासाठी काम करणार आहे असे आश्वासन त्यांनी या वेळेस सर्वांना दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : ॲड. श्रीहरी बागल

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा